Chikhali News : आर्थिक चणचणीतून तृतीयपंथीयाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – आर्थिक चणचण भासू लागल्याने एका तृतीयपंथीयाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री तळवडे येथे घडली.

राहुल ऊर्फ अंकिता ऊर्फ रोषणी जगदीश भानत (वय 23, रा. रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भानत मूळचा मुंबईचा रहिवासी असून दोन महिन्यांपूर्वी तो पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाला होता. रूपीनगर, तळवडे येथे त्याने भाड्याने खोली घेतली होती. भिक्षा मागून तो स्वतःची गुजरण करीत होता. मात्र आर्थिक चणचण वाढू लागल्यामुळे त्याने राहत्या घरात सोमवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.