Mumbai : मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू; काहीजण पुण्याचे असल्याची शक्यता

एमपीसी न्यूज : मुंबईहून गुजरातकडे (Mumbai) जाणाऱ्या भरधाव कारवरील ताबा सुटल्याने कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर यामध्ये 5 वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी पालघरच्या मेंढवन घाटात हा भीषण अपघात झाला. यामध्ये काहीजण पुण्याचे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

समोर मोठे वळण आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तिघेही एकाच कुटुंबातील होते. तसेच या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

Pimpri : झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला कारची धडक; दोघेजण गंभीर जखमी

यामध्ये संपूर्ण कारचा चुराडा झाला असून य अपघातात हर्षद गोडबोले (वय 42), आनंदी गोडबोले (वय 5) आणि वाहन चालक (Mumbai)  मिलिंद वैद (वय 43) यांचा मृत्यू झाला आहे. तर हर्षदा गोडबोले (वय 37), अद्वैत गोडबोले ( वय 12) अशी जखमींची नावे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.