Chinchwad : शिक्षण व्यवस्थेत महर्षी दयानंद यांचे संस्कार विधी ग्रंथातील विधींचा समावेश केला पाहिजे – ॲड. अश्विनी कुमार उपाध्याय

एमपीसी न्यूज – भारतीय शिक्षण व्यवस्थेत महर्षी दयानंद यांचे संस्कार(Chinchwad) विधी ग्रंथातील विधींचा आणि भारतीय कुटुंब संहितेचा समावेश केला पाहिजे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी केले.

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र व विजयादशमीचे औचित्य साधून हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन शनिवारी चिंचवड येथे करण्यात आले आहे. यावेळी ॲड. उपाध्याय यांचे रामराज्य आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान झाले.

यावेळी प्रा. डॉ. धनंजय सोमनाथ भिसे यांना स्व. प्रा. एकनाथ  नाणेकर स्मृती समाज भूषण पुरस्कार 2023 आणि अरुण श्रीपती पवार यांना स्व. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार 2023 संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पं. धर्मवीर आर्य, गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, समन्वयक कैलास बारणे, संयोजक सुहास पोफळे आदी उपस्थित होते.

Nagpur : मणिपूरमध्ये अचानक हिंसाचाराची आग कशी लागली? – मोहन भागवत

ॲड. उपाध्याय यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर मॅकलेची शिक्षण व्यवस्था स्वीकारण्यात आली. यातील दोष समजण्यास 75 वर्षाचा काळ लागला. सध्याची शिक्षण व्यवस्था भेदभाव करणारी आहे. यातील अभ्यासक्रम व्यावहारिक पातळीवर योग्य नाहीत. त्यामुळे गुरुकुल शिक्षण व्यवस्थाच योग्य आहे. देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडसर वाढती लोकसंख्या आहे. देश स्वतंत्र झाला त्यावेळी 4 कोटी असणारी लोकसंख्या 75 वर्षात 140 कोटी झाली. आजही देशात 80 कोटी गरीब आहे. देशात जर लोकसंख्या नियंत्रण कायदा झाला नाही, तर देश विनाशाच्या मार्गावर आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे सर्व यंत्रणेवर ताण निर्माण होतो. त्यासाठी एक भारतीय कुटुंब संहिता बनवणे आवश्यक आहे. जगाला दहशतवाद आणि हिंसाचाराने विळखा घातला आहे.हिंसा रोखण्यासाठी भारतीय शिक्षणाबरोबरच भारतीय उपचार पद्धतीतही बदल होणे आवश्यक आहे. भारतीय आयुर्वेद, योग, प्राणायाम, निसर्गोपचार उपचार पद्धती चांगली असतानाही ऍलोपॅथीच्या प्रचार, प्रसार करणारे कायदे पंडित नेहरूंच्या काळात झाले ते बदलण्याची गरज आहे.

स्वागत, प्रास्ताविक करताना उत्तम दंडीमे यांनी सांगितले की, भारताला बलसंपन्न आणि शक्तिशाली बनवण्यासाठी, महिलांना सक्षम करणे, हिंदूंचे धर्मांतर रोखणे, धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत वेद विद्यालय सुरू करणे यासाठी हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान काम करीत आहे.

यावेळी सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले तर आभार सुहास पोफळे यांनी (Chinchwad) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.