Dr. Amol Kolhe : साहित्यिकांनी समाजाला आरसा दाखवला पाहिजे – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – सत्ता आणि सत्ताधारी यांनी आचरणात आणण्याचे (Dr. Amol Kolhe)पथ्य’ हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यावर लिहिला गेलेला अग्रलेख हा आजच्या राजकारण्यांसाठी एक आरसा आहे. साहित्यिकांनी समाजाला आरसा दाखवला पाहिजे,असे परखड भाष्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात केले.

ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी संकलित केलेल्या (Dr. Amol Kolhe)स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याविषयीचे वृत्तपत्रीय लेख आणि अग्रलेखांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Moshi : मोशी येथे साडे सहा लाखांचा गुटखा पकडला; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

त्याप्रसंगी बोलताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, आज खरे बोलण्यापेक्षा बरे बोलावे लागते ही राजकारणाची शोकांतिका आहे.‌ सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या प्रश्नांपेक्षा राजकीय कलगीतुरा आणि मसालेदार विषयांना जास्त प्रसिद्धी लाभते. त्यामुळे साहित्यिकांची जबाबदारी अधिकच वाढली आहे.

इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या दोन दिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलनात मान्यवरांपासून सर्वसामान्य रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याविषयीचे वृत्तपत्रीय लेख आणि अग्रलेखांचे प्रदर्शन’ याविषयी ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे म्हणाले की, “बालपणापासून वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकनेते यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्याविषयी वाचन करीत असतानाच त्यांच्या सुसंस्कृत, दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाने मनाला खूप प्रभावित केले होते.

त्या काळातच रामभाऊ जोशी लिखित ‘यशवंतराव चव्हाण : इतिहासाचे एक पान’ हे पुस्तक प्रकाशित झाले. मोशीसारख्या त्या काळातील ग्रामीण भागात हे पुस्तक उपलब्ध झाले नाही म्हणून मी धाडस करून चव्हाणसाहेबांना चक्क साधे पोस्टकार्ड पाठवून पुस्तक वाचण्याची इच्छा कळवली होती. साहेबांच्या मनाचा मोठेपणा इतका की, त्यांनी माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याच्या पत्राची दखल घेऊन ते पुस्तक मला पाठवले. अर्थातच माझ्यासाठी तो अतिशय आनंदाचा अन् संस्मरणीय अनुभव होता. पुढे चव्हाण साहेबांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला.

त्यांच्या खानदानी, शालीन अन् उमद्या आचरणापासून प्रेरणा घेऊन समाजकारणात कार्यकर्ता म्हणून मी काम करू लागलो.

महाराष्ट्राचा सह्याद्री’ असा ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो त्या यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी राज्याच्या विकासाचा आराखडा मांडताना मराठी भाषा, साहित्य आणि कलेचाही विचार केला आणि तो राबविला. त्यांनी पक्षीय राजकारणाचा अभिनिवेश बाजूला ठेवून नेहमी बेरजेचे राजकारण केले आणि नेहमी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवला. आजच्या काळात राजकारण आणि समाजकारण खूपच आव्हानात्मक झाले आहे.

अशा परिस्थितीत सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून चव्हाणसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख तर होतेच, शिवाय त्यातून दीपस्तंभासारखे मार्गदर्शनही लाभते, अशी भावना अरुण बोऱ्हाडे यांनी व्यक्त केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.