Pune News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अद्याप जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 863 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे.पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या मुदतीत प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.जिल्ह्यात आज अखेर एकूण 4 लाख 98 हजार 278 शेतकऱ्यांपैकी 3 लाख 38 हजार 415 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. उर्वरीत 1 लाख 59 हजार 863 लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.