एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूने महाराष्ट्रात पहिला बळी घेतला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा आज (मंगळवारी) मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणूने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. पुण्यामध्ये सात तर पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. मुंबईत देखील पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी उपचार सुरु असलेल्या एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा आज मृत्यू झाला आहे. देशातील हा तीसरा मृत्यू आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.