Kalewadi : संत समाजपरिवर्तनाचे कार्य करतात – ह.भ.प. राघव चैतन्य महाराज

एमपीसी न्यूज – संत त्यांच्या अभंगातून, ओव्यामधून समाजपरिवर्तनाचे कार्य करतात! असे विचार सांगवी येथील सद्गुरू साधुबाबा ब्रह्मसंप्रदाय प्रणीत- स्वस्वरूप शोधक साधक संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. राघव चैतन्य महाराज यांनी शनिवारी (दि.10) काळेवाडी (Kalewadi) येथे व्यक्त केले.

श्री सद्गुरू सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष ब्रह्मलीन विठ्ठलानंद मतेदादा महाराज यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित सत्संग सोहळ्यात निरूपण करताना राघव चैतन्य महाराज बोलत होते. नांदेड (पुणे) येथील ओम निरंजन साधकाश्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. दत्ताभाऊ कोरपडे महाराज, ह.भ.प. गुलाबराव नरकेमहाराज, ब्रह्मसंप्रदाय संस्था कामरगाव (जिल्हा अहमदनगर) येथील ह.भ.प. बाळासाहेब भुजबळ महाराज, ह.भ.प. नामदेव जाधव महाराज, ह.भ.प. पोपट पाडेकर गुरुजी, ह.भ.प. नामदेव चौधरी तसेच ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, नंदकुमार मुरडे, रघुनाथ पाटील, तानाजी एकोंडे, सुभाष चव्हाण, नारायण कुंभार, दिलीप कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Pune Rain : पुण्यात मुसळधार पाऊस; पाषाणमध्ये पावसाचा जोर अधिक

या प्रसंगी निरंजन साधकाश्रम परिवार, ब्रह्मसंप्रदाय (Kalewadi) परिवार यांच्या साधकांनी आपल्या मनोगतांमधून ह.भ.प. विठ्ठलानंद मते दादा महाराज यांच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि व्यक्तिगत आठवणींना उजाळा देत भक्तिरसाचा सार सांगितला. ह.भ.प. राघव चैतन्य महाराज यांनी संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर निरूपण करताना आपल्या ओघवत्या शैलीतून, “प्रपंचातील व्यवस्था अन् परमार्थामधील अवस्था सांभाळण्यासाठी मानवी जीवनात संतांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे विचार मांडले.

कार्यक्रमाच्या संयोजनात ह.भ.प. अशोक गोरेमहाराज, कैलास अवचट, हरिभाऊ कुटे, रावसाहेब कातोरे, वाघबाई, रुक्मिणी धामणे, सुनंदा वाजे, विवेक मते, जगन्नाथ मते, शरद काणेकर, किसन मते, संजय भगत, शंकर मते, अलका श्रीमंदीलकर यांनी परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.