Katraj : कात्रज तलाव बनत आहे मृत्यूचा सापळा – आशिष भोसले

एमपीसी न्यूज – ऐतिहासिक वारसा लाभलेला (Katraj) नानासाहेब पेशवे तलाव कात्रज या ठिकाणी वारंवार आघात निर्माण झाले आहेत. तलावामध्ये मागील 2 दिवसापूर्वी एक तरुण नजरचुकीने पाण्यात पडून अंदाज न आल्याने त्याचा जीव गेला. दरमहिना 4-5 प्रकार सातत्याने हे घडत आहे. हा तलाव मृत्यूचा सापळा बनत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्वराज्य पक्षाचे सदस्य आशिष भोसले यांनी केला आहे.

महादेव नगर, शेलार माळा, गुजरनिंबाळकर वाडी या कात्रजच्या वाड्या वस्तीमधील लोकांना कात्रज गाव जिथे शालेय मार्गासाठी या पुलावरून मार्ग आहे. सातत्याने रहदारी या पुलावरून असते. अनेक लहान विद्यार्थी या पुलावरून प्रवास करत आहेत. पावसाळ्यात पाणी दरवर्षी ओव्हरफ्लो होत आत्महत्या तसेच अन्य प्रकारातून तलावामध्ये अपघाताचे प्रमाण खूप आहे.

PCMC : बसथांबे, बॅरिकेड्स दुरुस्तीसाठी 2 कोटींचा खर्च

या तलावावरील असणाऱ्या पुलावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी नाही. आम्ही अनेक संबंधित व्यक्तींना पुलाच्या बॅरिकेट पासून 15 फूट उंचीची जाळी बसवून द्यावी, अशी मागणी केली. पण, प्रशासकीय अधिकाऱ्यांना अजून किती (Katraj) जीव गेल्यावर जाग येणार, असा सवालही आशिष भोसले यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.