Maharashtra : मोठी बातमी! निलेश राणे यांनी घेतला राजकारणातून संन्यास

एमपीसी न्यूज : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी आपण सक्रिय राजकारणापासून दूर (Maharashtra) जात असल्याची घोषणा करत आपल्याला राजकारणात रस नसल्याचे म्हटले आहे. 42 वर्षीय निलेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती दिली. निलेश राणे म्हणाले की, राजकारण सोडण्याचे दुसरे कारण नाही. ते म्हणाले की मी खूप भाग्यवान आहे की मला भाजपचे इतके प्रेम मिळाले आणि भाजपसारख्या संघटनेत काम करण्याची संधी मिळाली.

निलेश राणे यांनी लिहिले आहे की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.

मागच्या 19/20 वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. (Maharashtra)

निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही.

Pimpri : हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचा संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार वृक्षमित्र अरुण पवार यांना प्रदान  

कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. तसेच शेवटला जय महाराष्ट्र म्हणत निलेश राणे यांनी राजकारण सोडल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने सर्वांना धक्का बसला असून त्यांचे राजकारण सोडण्यामागच्या कारणावरून आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.