Maharashtra Crisis : अखेर 9 महीने 9 दिवसांनी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण; आता लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे!
एमपीसी न्यूज : अखेर नऊ आणि नऊ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Crisis) सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सर्वोच्च न्यायालय कोणत्या गटाच्या बाजूने निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आज सुनावणी पूर्ण झाली. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
Indian Army : भारतीय लष्करातील ‘चित्ता’ हेलिकॉप्टर तिसऱ्यांदा कोसळले; दोन जवान बेपत्ता
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाची बंडखोरी आणि त्यांनी स्थापन केलेले सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाने राज्यपालांनी फ्लोर टेस्टचा आदेश दिल्याचा युक्तिवाद केला होता. गेले 9 दिवस (Maharashtra Crisis) आरोप-प्रत्यारोप- वाद आणि प्रतिवाद सुरू होता. आता अखेर निकालाची वाट पाहावी लागणार आहे.