Pimpri News: रावेतच्या उदंचनगृहात झाडे, कचरा अडकला; ‘एमआयडीसी’च्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

एमपीसी न्यूज – पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रावेत येथील उदंचनगृहात झाडे, कचरा अडकला आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

एमआयडीसीकडून पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात पाणीपुरवठा केला जातो.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पाणी पुरवठा होणा-या पवना धरणाच्या क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्याचा महामंडळाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

रावेत येथील उदंचनगृहाजवळ वाहून आलेली झाडे, कचरा अडकला आहे. महामंडळाचे अशुध्द जलकेंद्र 50 टक्के क्षमतेने कार्यन्वित आहे. त्याचा परिणाम महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रास तसेच महामंडळाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेस, संरक्षण खात्यास, होणा-या पाणी पुरवठ्यावर झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.