Pimpri : शहरातील सोसायट्यांची पाणी बिले माफ करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – शहरात महापालिकेने पाणी कपात जाहीर केली आहे. परंतु, त्या आधीपासूनच अनेक सोसायट्यांना खासगी टॅंकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे सोसायट्यांची पाणी बिले माफ करावीत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच पाणी कपात ओढवली आहे. पालिकेत याआधी राष्ट्रवादीची सत्ता असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रत्येक बाबतीत लक्ष देत होते.

मात्र, भाजपची सत्ता आल्यापासून जनतेला कोणीच वाली राहिला नाही. भाजपचा पालिका प्रशासनावर अजिबात वचक नाही, असा आरोप तापकीर यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.