Pimpri : 101 सेकंद स्तब्ध राहून राजर्षी शाहू महाराज यांना कष्टकऱ्यांनी वाहिली आदरांजली

एमपीसी न्यूज – लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती (Pimpri) शताब्दी वर्ष सांगताच्या निमित्ताने कष्टकरी संघर्ष, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने 101 व्या स्मृतिदिनानिमित्त 101 सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहिली.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,बालाजी लोखंडे, सलीम डांगे, सुनिता पोतदार, कलावती पाल, सुमन गायकवाड,
जयश्री सोनगिरे, अजय कारंडे, प्रकाश देविकिरी, राजू बिराजदार, संजय भांगे, महादेव गिरीसागर, सागर ठोंबरे, ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते.

नखाते म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांनी राजेशाहीचा थाट लोकांवर लादला नाही. ते राजाप्रमाणे आयुष्य आरामात जगले नाहीत तर सर्व क्षेत्रांमध्ये जाऊन तिथल्या लोकांमध्ये रममान होऊन तिथल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली. राजवाड्याऐवजी खेडोपाडी, रानावनात, गरिबांच्या, कामकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, झोपडीमध्ये जाऊन कांदा -भाकर खाऊन त्यांची सुख : दुख जाणून घेतेली. कष्टकरी कामगारांना काम मिळत नव्हते.

Akurdi : साक्ष देऊ नये म्हणून खंडणी मागत एकाला माराहाण; 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा

अशा कालावधीमध्ये त्यांनी विविध रस्त्यांचे, धरणांची निर्मिती करून रिकाम्या हाताला (Pimpri) काम दिले. इतकेच नाही तर त्यांना प्रत्येकाला रोजगार, त्याचा मेहनताना, मूल्य मिळते का नाही यावरती त्यांचे बारीक लक्ष असायाचे अशा सर्व क्षेत्रांमध्ये योगदान असणा-या लोकराजाला कष्टकरी वर्ग कधीच विसरू शकणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.