Pune : ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर पहाटे पाच वाजेपर्यंत राहणार संचारबंदी

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पुण्यातही ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात आला आहे. पुणे शहरात रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत हा कर्फ्यू लावण्यात येणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात प्रथमच संचारबंदी लागू केली.

या काळात कोणालाही रस्त्यावर चालणे, फिरणे, वाहतूक संचार आणि उभे राहता येणार नाही. कोणत्याही एकट्या व्यक्तीला चालता, फिरता येणार नाही‌. जीवनावश्यक सेवा वगळता सर्वांना हा कर्फ्यू लागू आहे. कायद्याचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

व्यक्तींना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्याचा त्याचबरोबर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शहरात माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.