Pune : देशात येत असलेले कोट्यावधींचे ड्रग्ज मोदी सरकारचेच अपयश – गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस आयुक्त व त्यांची टिम रोज विविध (Pune) ठिकाणाहून ड्रग्ज पकडून जप्त करत आहेत. मोदी सरकार देशात 10 वर्षे सत्तेत राहूनही कोट्यावधींचे ड्रग्ज आले कुठून? या गंभीर प्रश्नापासून सरकारला पळ काढता येणार नसून, सत्तेतील भाजपला याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

काही महिन्यांपूर्वी सातत्याने गुजरातमधील अडानींच्या ‘मुंद्रा पोर्टवर’ पकडण्यात आलेले कोट्यावधींचे ड्रग्ज नष्ट केल्याचे दाखले – संदर्भ देखील गृह विभागाने जाहीर करावेत, अशी मागणी तिवारी यांनी केली.

70 वर्षात सर्वाधिक क्राईम रेट देशात व राज्यात वाढला असून, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील तरुण पिढीस नशेच्या खाईत ढकलण्याचे पापकर्म करण्याचे धाडस कोणी करू नये, असा सज्जड दम देखील काँग्रेसने भरला. देशाच्या सिमा ओलांडून देशांतर्गत येत असलेले अंमली पदार्थ केंद्रीय गृह विभागास दिसत नसून, या ड्रग्जना मोदी सरकार रोखू शकत नसल्याचे सिद्ध झाले आहे.

Pune: निवडणूक खर्च दरनिश्चिती समितीची बैठक संपन्न 

त्यामुळे ते पकडण्यास राज्यातील व पुणे शहरातील पोलिसांवर ताण पडत आहे. पोलीसांना इतर सुरक्षेकडे लक्ष देण्यास ही मर्यादा येत आहेत, ही देशाच्या गृह खात्यास लाजीरवाणी बाब असल्याचेही काँग्रेसने म्हंटले आहे.

एकेकाळी देशात सुरक्षित व सुसंस्कृत शहर म्हणून ख्याती असलेले (Pune) ‘पुणे शहर व महाराष्ट्रास’ ड्रग माफीयांचे केंद्र करावयाचे आहे काय ? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. ससून हॉस्पिटल मधून अंमली पदार्थाचे रॅकेट चालवणाऱ्या डॉ. संजीव ठाकूरला अद्यापही अटक का केली जात नाही? ललीत पाटील आरोप पत्र दाखल का केले जात नाही? असे संतप्त सवालही गोपाळ तिवारी यांनी उपस्थित केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.