Pune News : झोपडपट्टीवासीयांचा पुण्यात आक्रोश मोर्चा
एमपीसी न्यूज – राज्यातील सरकारी, गायरान, शासकीय, निमशासकीय, वने, रेल्वेलगत नदी, नाले, पाटबंधारे, डोंगरालगत असलेल्या झोपडपट्टी अतिक्रमणे नियामानुकूल करून झोपडीधारकांच्या मालकीचा 7/12 उतारे द्या. या मागणीसाठी आज (सोमवारी) पुण्यातील (Pune News) अलका चौकातून पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने लोक यात सहभागी झाले होते.
कामगार नेते प्रविण बाराथे, ज्येष्ठ कायदे सल्लागार अॅङ राहील मलिक आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी महम्मद शेख, दत्ता डाडर, शिवाजी भिसे, राजाभाऊ शिंदे, हरिभाऊ वाघमारे, सुनिल भिसे, प्रा. सुरेश धिवार, सुरेखा भालेराव, वैशाली अवघडे, वंदना पवार, प्रमिला ठोंबरे, नितिन वन्ने, दत्ता कांबळे, प्रदिप पवार, संतोष सोनावणे, आबा शिंदे, आबा चव्हाण, बापू शेंडगे, तानाजी पाथरकर आदींची भाषणे झाली.
याप्रसंगी या मोर्चात साहित्यीक आचार्य रतनलाल सोनग्रा असे म्हणाले की, गरीब जनतेच्या जीवनामध्ये त्याच झोपडं महत्वाच असतं, त्याचा निवारा हिसकवणे हे अमानुष कृत्य आहे.(Pune News) शासनाने रयतेचा निवारा द्यावा आणि गोरगरिबांचा आशिर्वाद घ्यावा. रयतेला दडपून जे शासन गैरकृत्य करते ते नष्ट होऊन जाते. म्हणून हा आक्रोश मोर्चा सरकारला ईशारा आहे. प्रास्ताविक राज्य सरचिटणीस काशिनाथ गायकवाड यांनी केले. आभार गणेश लांडगे यांनी मानले.