Talegaon : राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून शंकरवाडीसह परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी

एमपीसी न्यूज – जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आज शेलारवाडी येथे नव्याने जोडण्यात येणाऱ्या 38 लक्ष रुपयांच्या पाणी योजनेचा भूमिपूजन शुभारंभ राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला.

शंकरवाडी हा भाग स्वातंत्र्यनंतरही देहूरोड कॅन्टोन्मेंट,सोमाटने ग्रामपंचायत आणि तळेगांव दाभाडे नगरपरिषद असेल ह्या मध्ये समाविष्ट नसल्यामुळे शंकरवाडी व टोलनाका परिसरातील नागरिकांच्या पाण्याची अंत्यत गैरसोय होत होती. सर्व नागरिकांना न्याय देण्याचा भूमिकेतून राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 38 लक्ष रुपये शंकरवाडी व टोल नाका परिसरातील पाणी योजनेकरीता मंजूर करून घेऊन आज या पाणी योजनेच्या भूमिपूजन शुभारंभ करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आगामी काळात सर्व नागरिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशी ग्वाही यावेळी दिली.

याप्रसंगी ज्येष्ठनेते शंकरराव शेलार, कैलास पानसरे, बाळासाहेब शेलार, कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष रघुवीर शेलार ,संतोष कुंभार,नगरसेवक विशाल खंडेलवाल, राहुल बालघरे,सारिका नाईकनवरे, अरुणा पिंजण, अशोक मामा शेलार, गोपाळ शेलार, लहू शेलार,गजानन शेलार, उद्धव शेलार, शंकर भेगडे, बाळ तात्या भेगडे, पाणीपुरवठा अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.