Pune : नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर येथे ऑगस्टच्या पाहिल्या आठवड्यात कृत्रिम पाऊस पाडणार – डॉ. अनिल बोंडे
एमपीसी न्यूज – राज्यातील अनेक भागात 7 जुलैपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतीचा विचार करून नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर येथे ऑगस्टच्या पाहिल्या आठवड्यात कृत्रिम पाऊस पडण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत सर्व विभागासोबत चर्चा देखील करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे कृषि विभागातील योजनांच्या आढावा बैठक राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना राज्यातील कृषी विभागा बाबत माहिती दिली.
- यावेळी डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, कृत्रिम पाऊस हा ज्या ठिकाणी पाडला जाणार आहे. त्यानुसार आसपासच्या 400 किलोमीटरच्या भागात पाऊस पडतो. त्या कृत्रिम पावसाचा फायदा राज्यातील अनेक भागातील शेतकर्यांना होणार असून त्यामुळे दुबार पेरणीची आवश्यकता शेतकर्यांना पडणार नाही. दुबार पेरण्याची आवश्यकता भासल्यास राज्य सरकारकडून शेतकर्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. तसेच राज्यातील शेतकर्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खत वापरण्यावर भर देण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.