एमपीसी न्यूज : आळंदी येथे दि.18 व 19 एप्रिल रोजी अजिंक्य डी. वाय. पाटील कॅालेज, 1 महाराष्ट्र सिग्नल कंपनी एन.सी.सी. युनीट आणि आळंदी नगरपरिषद (Alandi) यांच्या संयुक्त विद्यमानाने पुनीत सागर अभियान अंतर्गत इंद्रायणी नदी तीरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या वेळी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, प्रा. अनिकेत नेमाडे, भाजपा शहराध्यक्ष किरण येळवंडे, कॅडेट श्रीवल्लभ बोरूडे, (Alandi) सुरज नलावडे, इंद्रवदन नलावडे, भागवत कोली व अजिंक्य डी. वाय. पाटील कॅालेजमधील एन. सी. सी. कॅडेटस् उपस्थित होते.याबाबत माहिती सचिन गिलबिले यांनी दिली.