Bhigwan : चालकाचा गाडीवरून ताबा सुटला; अपघातात तिघांचा मृत्यू
एमपीसी न्यूज : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात (Bhigwan) शुक्रवारी पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावर कार उलटून भीषण अपघात झाला यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.
Alandi : पुणे-आळंदी रस्त्यावरील वीजेच्या खांबास चारचाकी वाहनाची धडक
कार चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने पहाटे पावणे चार वाजता हा अपघात झाला. भिगवण येथील महामार्गावरील उतारावर कार तीन वेळा पलटी झाल्याने संदिप माळी (वय 35), त्यांची आई सरस्वती (वय 61) आणि बालाजी केरबा तिडके (48, रा. लातूर) यांचा मृत्यू झाला. तर, चंद्रकांत गवळी (वय 54) हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.