Bhosari : पाणी कपात रद्द करण्याची नगरसेविका प्रियंका बारसे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणाचा पाणी साठा ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाला. मे महिन्यापासून शहरात पाणी कपात केले आहे. पवना धरणाचा पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तरी पाणी कपात रद्द करावी, अशी मागणी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, मे महिन्यांपासून शहरात पाणी कपात केले आहे. पवना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरवासियांकडून अशी आशा आहे की, आता तरी पाणी कपात रद्द करुन रोज पाणीपुरवठा करावा, असेही निवेदनांत म्हटले आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.