Sri Lanka – श्रीलंकेमध्ये वातावरण अधिक तापले; काय आहेत त्यामागची कारणे?

एमपीसी न्यूज : श्रीलंकन (Sri Lanka) ​​पोलीस अधिकाऱ्यावर संतप्त जमावाने हल्ला केल्याची मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंकेमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र समोर दिसत आहे.

राजधानी कोलंबोमधील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाजवळ पोलिसांचे वाहनही जाळण्यात आले. वरिष्ठ उपमहानिरीक्षक देशबंधू तेनाकून, कोलंबोमधील सर्वोच्च दर्जाचे अधिकारी, यांना आपत्कालीन उपचारासाठी नेण्यात आले असल्याची माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली.

sri lanka

श्रीलंकेमध्ये मंगळवारी सैन्य आणि पोलिसांना आपत्कालीन अधिकार सुपूर्द करण्यात आले. सैन्याला वॉरंटशिवाय लोकांना ताब्यात घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर एका दिवसातच झालेल्या संघर्षात सात लोक ठार झाले तर 200 हून अधिक जखमी झाले. या हिंसाचारामुळे महिंदा राजपक्षे – त्यांचे मोठे बंधू अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास आणि नंतर नौदल तळावर आश्रय घेण्यास प्रवृत्त करण्यात आले.

स्वातंत्र्यानंतरची सर्वात वाईट स्थिती –

हा देश 1948 मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला आहे. अन्न आणि इंधनाचा तुटवडा, वाढत्या किंमती आणि वीज कपात यामुळे श्रीलंका (Sri Lanka) स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परिस्थिती हातळण्यासाठी सरकार अक्षम ठरल्याचे लोकांनी म्हंटले आहे. कोविड-19 साथीच्या काळात पर्यटनात झालेली घसरण तसेच अविचारी आर्थिक धोरणांमुळे परकीय चलनाची कमतरता हे या मंदीचे कारण आहे. श्रीलंकेची लोकसंख्या 22 दशलक्ष आहे आणि या वर्षी दुसऱ्यांदा आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे.

sri lanka burn

सरकारी नेते आणि कार्यकारी मंडळांच्या घरावर हल्ले –

हजारो आंदोलकांनी सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि प्रांतीय राजकारण्यांची घरे, वाहने, दुकाने आणि व्यवसायिक आस्थापनाना आग लावली. कर्फ्यूचे उल्लंघन करून सरकारी व्यक्तींवर हल्ला देखील केला आहे. आंदोलकांनी मध्य कोलंबोमध्ये श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे घर म्हणून काम करणारी दोन मजली वसाहतकालीन इमारत असलेल्या टेम्पल ट्रीजच्या गेटमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जेथे मंगळवारी आजूबाजूच्या रस्त्यावर तुटलेली काच आणि फेकलेले शूज पडले होते.

आंदोलकांनी (Sri Lanka) दक्षिणेकडील हंबनटोटा जिल्ह्यात राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घर आणि त्यांच्या विश्वासूंच्या इतर बऱ्याच इमारती जाळल्या. महिंदा राजपक्षे यांनी पत्नी आणि कुटुंबासह निवासस्थानातून पळ काढला आणि ईशान्य श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथील नौदल तळावर आश्रय घेतला. मंगळवारी पहाटे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार करण्यात आला.

Supreme Court : देशद्रोह कायद्याबाबत केंद्राला सर्वोच्च न्यायालयाने दिले 24 तास

आणीबाणी सावरण्यासाठी सैन्याला आदेश –

आर्थिक आणि राजकीय संकटांच्या विरोधात श्रीलंकेमध्ये निदर्शने सुरू असल्याने अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी सकाळपर्यंत राष्ट्रीय कर्फ्यू वाढविला आहे.

सैन्याला आणीबाणीच्या दिलेल्या अधिकारांमुळे ते अटक केलेल्या लोकांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी 24 तासांपर्यंत ताब्यात ठेवू शकतात. तसेच, शासनाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार खासगी वाहनांसह खासगी मालमत्तेचीही सक्तीने झडती घेऊ शकणार आहेत.

भारताची 3.5 अब्जापेक्षा जास्त आर्थिक मदत –

भारताने श्रीलंकेच्या लोकांना त्यांच्या सध्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत करण्यासाठी 3.5 अब्जापेक्षा जास्त आर्थिक मदत दिली आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.