Fadnavis Vs Thackeray : बॉम्ब फोडा पण धूर काढू नका कारण कोरोना गेला नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

एमपीसी न्यूज – दिवाळीनंतर बॉम्ब फोडतो असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. बॉम्ब फोडा पण धूर काढू नका कारण कोरोना अजूनही गेला नसल्याची आठवण त्यांना मुख्यमंत्र्यांनी करून दिली. बारामतीत पार पडलेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी कधी डगमगलो नाही, आणि पुढे कधी डगमगणार नाही. विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करतात. राजकारणात अनेकांचे एकमेकांशी पटत नाही, त्यामुळे चांगल्या कामात अडथळा आणणे ही आपली संस्कृती नाही.

ते पुढे म्हणाले, आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरदबाबू जे करताहेत ते बघायला हवं, या त्यांनी आवर्जून सांगितले. बारामती देशातील सर्वोत्तम केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.