Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

एमपीसी न्यूज – रायगड (Raigad News) जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 80 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जात असून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Alandi : आळंदीमध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ तिसऱ्या वर्गाचा उद्घाटन सोहळा

मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सुमारे 80 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. दरम्यान यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इर्शाळवाडी 227 लोकसंख्या असलेली वाडी आहे. त्यात सहा वर्षाखालील 25 मुले आहेत. या घटनेतील जखमींच्या नातेवाईकांनी इर्शाळवाडी गावाकडे धाव घेतली आहे. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना अडथळा होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे त्यामुळे घटनास्थळी जास्त गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 

या घटनेतील जखमींवर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. नवी मुंबई येथील रुग्णालयात सुमारे 100 जणांना उपचार करता येतील याची व्यवस्था करण्यात आली आहे. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौक दुरक्षेत्र येथे तात्पुरते नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींच्या नातेवाईकांनी या नियंत्रण कक्षाशी (8108195554) संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1681885143462731776?t=pJB3XAhLA7s8IL6iJ4-t_Q&s=19

 

या घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जाणार आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.