NCP Protest : दिवाळी तोंडावर पण राज्य शासनाचा आनंदाचा शिधा गायब
शहर अध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, महारष्ट्र हा महागाईने त्रस्त झाला आहे. अनेक समस्या या राज्यासमोर असताना गरीब जनतेला शंभर रुपयाची आनंदी किट देण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात फक्त किटचा गाजावाजा केला पण गरिबांपर्यंत किट पोहचले नाही या अयशस्वी सरकारचा निषेध करतो.
शहराध्यक्षा कविता आल्हाट म्हणाल्या, राज्य सरकारने गोरगरीब (NCP Protest) जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली आणि चित्रात दिवाळी साजरी करायला सांगितली. गोरगरिबांची दिवाळी चित्रात आणि दिवाळी फराळ सरकारच्या पत्रात असा आरोप त्यांनी केला. विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे म्हणाल्या, ऐन दिवाळीच्या काळात गरिबांच्या घरात अंधार पडला पण या सरकारला काही फरक पडेना. विरोधी पक्षनेते अजित दादांनी राज्यात दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितले, परंतु सरकार आपल्याच तंद्रीत आहे. जन सामान्यांचे त्यांना काही घेणे देणे नाही असा आरोप राज्य सरकारवर केला.