PCMC: शहरवासीयांनो पाण्याचा जपून वापर करा, पवना धरणात फक्त ‘इतका’ पाणीसाठा

एमपीसी न्यूज – शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना (PCMC) धरणातील पाणीसाठा 20.40 टक्‍क्‍यांवर आला आहे. जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षी आजच्या तारखेला 22.06 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्‍यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. गतवर्षी पाणलोट क्षेत्रात दोन हजार 777 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तीन वेळा धरण शंभर टक्के भरले होते. ऑगस्ट अखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते. शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. साडेतीन वर्षे झाले. तरी, शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे.

Pune : अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला

पवना धरणात सध्या 20.40 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. तर आंद्रा धरणातून 50 एमएलडी पाणी पुरवठा सुरू झाला असून टप्प्या-टप्प्याने आणखी 50 एमएलडी पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना सध्या तरी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही.

सध्या पवना धरणात गतवर्षीपेक्षा कमी म्हणजे 20.40 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. मात्र, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे (PCMC) यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.