Pimpri :  शिंदे-फडणवीस सरकारने वारकऱ्यांची माफी मागावी; आपची मागणी

एमपीसी न्यूज – माऊलींच्या  पालखीचे आळंदीहून पंढरपूरकडे (Pimpri) प्रस्थान होत असताना वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. शिंदे-फडवणीस सरकारने वारकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

माऊलीच्या ओढीने लाखो वारकरी या पालखीमध्ये सामील होतात. या पालखीला 800 पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे आणि वारकरी संप्रदाय हा भक्तिमार्गाने जाणारा, सर्व परिस्थितीशी विनातक्रार जुळवून घेत माऊलीच्या ओढीने हा वर्षानुवर्षे यात्रेचा प्रवास करीत असतो.

या परंपरेला गालबोट लागणारी घटना घडल्याचे आजवर कधीही समोर आलेले नाही. परंतु काल पोलिसांनी लाठीमार व बळाचा वापर केला. हे करण्यासाठी पोलिसांना आदेश कुणी दिले होते? गृहखाते सांभाळणारे फडणवीस यांनी याबाबत दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही.

Talegaon : स्वामी विवेकानंद इंग्रजी विद्यालयात शिक्षकांचे प्रशिक्षण

2018 मध्ये भाजप सत्तेत असताना वारीमध्ये साप सोडली जाण्याची भीती व्यक्त करून वारकऱ्यांमध्ये गोंधळ उडवला गेला होता. आताही भाजप आणि शिंदे गट सत्तेत असताना ही घटना घडली आहे. वारकऱ्यांसोबतचा लाठीमार आणि बळाचा वापर होताना आज भाजपच्या खऱ्या मानसिकतेचे दर्शन जनतेस झाले आहे. आम आदमी पार्टी या लाठीमाराचा निषेध करीत असून यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्रफडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांची जबाबदारी निश्चित करून निलंबनाची कारवाई (Pimpri) करावी अशी मागणी आपचे रविराज काळे यांनी केली (Pimpri) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.