Pune : अजित पवार यांचा निर्णय महाराष्ट्रासाठी चांगला -सुभाष जगताप

एमपिसी न्यूज – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय महाराष्ट्रासाठी चांगला आहे. कारण, केंद्रात भाजपा आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध होऊ शकतो. तीनपेक्षा दोघातल सरकार बरं, अस मला वाटते, अशा शब्दांत पुणे महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

24 ऑक्टोम्बरला निकाल लागला. तेव्हापासून काय राजकारण चालू होतं. राष्ट्रवादी काँगेसमुळे कॉग्रेस पक्षाचं अस्तित्व टिकलं. त्यांनी शरद पवार यांच्या शब्दाला मान दिला पाहिजे होता. पण, त्यांनी पवारांना दिल्लीला बोलावलं, हे योग्य आहे का?

विधानसभा निवडणुकीत काँगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी प्रचारात कुठे होत्या. त्यांचा सबंध काय? कॉग्रेसची मागणी उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, विधानसभा अध्यक्ष, एवढी पद ते पण संख्याबळ कमी असताना जरी मंत्रीपद दिली तरी नीट राहतील याची काय खात्री?, ते सरकारला वेठीस धरणारच! एक राष्ट्रवादी कार्यकर्ता दादासमर्थक म्हणून आपण अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत करीत आहे, असे जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.