Pune :पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

एमपीसी न्यूज :पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील(Pune ) राजगड किल्ल्यावर, पर्यटक फिरायल गेले त्यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात 25 जणांचा मधमाशांनी चावा घेतला. ही घटना किल्ल्यावरील सुवेळा माची परिसरात सकाळी साडे आठ सुमारास घडली .

या माध्यमशयांच्या हल्यात एका पर्यटकाला माशा चावल्याने तो बेशुद्ध पडला असून,चार जण गंभीर जखमी झाले आहेत .जखमींना वेल्हा पोलीस आणि स्थानिक यंत्रणेकडून स्ट्रेचरवरून गडावरून खाली आणण्यात आलं आहे .

Chakan : मित्राने केला कारचा अपहार

राजगडाच्या अतिदुर्गम सुवेळा माचीवर ही घटना घडली असून मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणचे चाळीसहून अधिक पर्यटक सुवेळा माची परिसरात भ्रमण करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.