पत्रकार धर्मावर बोलायला घाबरतात मात्र दाभोळकर घाबरले नव्हते – राजदीप सरदेसाई

अनिसचे जवाब दो आंदोलन; हिंसा के खिलाफ मानवता की और कार्यक्रम 

एमपीसी न्यूज – आज काल मोठमोठे चॅनल आणि त्यांचे पत्रकार धर्मावर बोलायला घाबरतात पण नरेंद्र दाभोळकर कधी घाबरले नाही. आजची पत्रकारिता पैशाच्या ताकदीला बळी पडत आहे. मात्र, दाभोळकर कशाच्या पुढे झुकले नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले.

अंधश्रद्धा निर्मूलनातील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (दि.20) चार वर्ष पूर्ण झाली तरी अद्यापही त्यांच्या मारेक-यांना शिक्षा झालेली नाही. तसेच सर्व तपास अत्यंत संथ गतीने होत आहे. याच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात येत आहे. निषेध रॅलीनंतर आयोजित हिंसा के खिलाफ मानवता की और उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी बोलताना सरदेसाई पुढे म्हणाले की, श्री श्री रवी शंकर, आणि बाबा रामदेव यांच्या वर आजकल कोणी बोलायला तयार नाही, कोणताही पत्रकार कोणताही चॅनल त्यांच्यावर बोलत नाही. कारण त्यांच्याकडे पैशाची ताकद आहे. तसेच राजनैतिक पाठबळ देखील या लोकांना लाभत आहे. पतंजली हा सर्वात मोठा जाहिरातदार आहे. त्यामुळे कोणताही मीडिया त्यांच्यावर लिहिण्यास दाखवण्यास घाबरत आहे. पत्रकारिता हा टीआरपीचा व्यवसाय झाला आहे.

ज्या बातम्यांना टीआरपी आहे तीच दाखवली जाते. देश हिताशी कोणाला देणे घेणे नाही. मीडिया एक तमाशा झाला आहे. रोज रात्री मोठमोठ्या चैनल वर 10 लोकांना बोलवून चर्चासत्राच्या नावाखाली तमाशा दाखवला जातो. पहिले हे हिंदीमध्ये होते आता मराठीतही सुरू झाले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.