Chikhali : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्याने दुचाकीवरून जाताना दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी साडेपाचच्या सुमारास रुपीनगर येथे घडली.

अक्षय सुनील साखरे (वय 22, रा. ओटास्किम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अविनाश लष्करे, सुनील चव्हाण, आदेश माने (सर रा. ओटास्किम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी अक्षय त्यांच्या दुचाकीवरून रुपीनगर येथून जात होते. त्यावेळी आरोपींनी अक्षय यांच्या दुचाकीला कट मारला. काही अंतर गेल्यानंतर आरोपींनी अक्षय यांना बोलावून घेतले. ‘शिवी कोणी दिली’ असे अक्षय यांनी आरोपींना विचारला असता ‘तुला लय मस्ती आली आहे का’ असे म्हणत त्यांना मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गट्टू डोक्यात मारून अक्षय यांना मारहाण केली. यामध्ये अक्षय जखमी झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.