Congress : काँग्रेसमधील गटबाजी रोखण्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – काँग्रेसमधील अंतर्गत (Congress) गटबाजी रोखण्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसमधील वाढती अंतर्गत गटबाजी, रुसवे आणि फुगव्यांसह आपापसातील मतभेद आगामी लोकसभा निवडणुकीत घातक ठरण्याची शक्यता असल्याने काँग्रेसमध्ये मनोमिलनासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार एका वरीष्ठ नेत्यावर स्नेहभोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. पण, काँग्रेसमध्ये दोन गट असून त्यांच्यातील वाद, मतभेद सातत्याने महायुतीने घटकपक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, अनेक जिल्ह्यांत महायुतीत आलबेल असल्याचे दिसून आले नाही. तीच स्थिती महाविकास आघाडीतही दिसून येत आहे. त्यातच पुण्यातील काँग्रेसअंतर्गतच असलेल्या अनेक गटांत रुसवे-फुगवे वाढून मतभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे.

Khed : ऊस जाळल्या प्रकरणी गुन्हा दाखल

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Congress) गटबाजी धोक्याची ठरण्याची शक्यता असल्याने पटोले यांनी ती रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी माजी मंत्री उल्हास पवार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांनी येत्या मंगळवारी (24 जानेवारी) स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे 20 जणांनी अर्ज सादर केले आहे. प्रदेश पातळीवरून या अर्जांची छाननी करून दिल्लीत उमेदवार फायनल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर काही जणांनी लगेच दिल्लीवारी करून टाकली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.