Navi Mumbai : बोटीतील शस्त्रास्त्रांबाबत तपास नवी मुंबई एटीएसकडे

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात दोन दिवसांपूर्वी शस्त्रांस्त्रांसह सापडलेल्या बोटीचा तपास आता दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटकडे सोपविण्यात आला आहे.ओमान येथून ही बोट भरकटत आल्याचे प्रथमदर्शीनी दिसून येत असले,तरी बोट आणि त्यातील शस्त्रे यांचे दहशतवादी धागेदोरे असल्याच्या संशयावरुन या प्रकारणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात आल्याची माहिती एंटीएसच्या सूत्रांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्र्वरच्या किनारी गुरुवारी सकाळी सापडलेल्या या संशटास्पद बोटीमध्ये तीन एके 47 रायफली आणि जिवंत काडतुसांचा बॅक्स सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला. पोलिस सुरक्षा वाढविण्यात आली. मुंबईतील 26/11 हल्ल्याच्या वेळी दहशतवादी रायगडमधील समुद्रातून शस्त्रास्त्रे घेऊन उतरल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ओमान येथून ही बोट भरकटत आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असले तरी या बोटीत एके 47 रायफली आणि जिवंत काडतुसे सापडल्याने त्यामागे दहशतवादी धागेदोरे आहेत का, याचा तपास करण्यात येत आहे. त्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार नवी मुंबई एटीएसच्या पथकाने एके 47 रायफली, जिवंत काडतुसे आणि इतर महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.