Pune : कोणत्याही नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा दिसत नाही, पुणेकर नागरिकांचा सवाल

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी (Pune) सहा दिवसापूर्वी शिंदे फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकारला पाठिंबा दर्शवित उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या घटनेनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्या राजकीय घडामोडीनंतर सर्व सामान्य नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया समोर येत असून त्याच दरम्यान पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहरात एक सही संतापाची मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेला कसबा विधानसभा मतदार संघातील शनिपार चौकात घेण्यात आलेल्या एक सही संतापाच्या मोहीमेस नागरिकाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

कोणत्याही पक्षातील नेत्यामध्ये पक्ष निष्ठा दिसून येत नाही. अशा शब्दात पुणेकर नागरिकांनी राजकीय नेत्यांना सुनावले.

यावेळी विनोद भट म्हणाले की, मागील काही महिन्यात देशात आणि (Pune) राज्यात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. आपण आज एकाला मतदान केले. पण चार वर्षांत कोण कोणा सोबत गेले. हे समजत नसून या राजकीय लोकांनी लोकशाहीची थट्टा लागल्याच यातून दिसत आहे.

हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटत आहे. एकमेकावर खालच्या स्तरावर आरोप प्रत्यारोप करायचे आणि काही तासात सत्तेसाठी त्यांच्याकडे जायचे. या सर्व घडामोडी पाहिल्यावर कोणत्याही पक्षातील नेत्यामध्ये पक्ष निष्ठा दिसून येत नाही. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

 तसेच ते पुढे म्हणाले की, शिंदे आणि फडणवीस यांच्या सोबत जाऊन अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार याच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप केले. पण एक गोष्ट नाकारता येत नाही. ती म्हणजे अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांना पडत्या काळात शरद पवार यांनी साथ दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू  – शशिकला गुरव 

सध्या अंत्यत चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू असून सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. आजपर्यंत वाद घातले आणि आता एकत्र आले आहे.हे सर्व नागरिकांनी लक्षात ठेवले पाहिजे.

आपण नेत्यांच्या मागे जातो आणि ते नंतर एकत्रित येतात. आपल्यामध्ये कायमचा वाईट पणा येतो. या राजकीय घडामोडीमधून आता तरी शिकले पाहिजे. अशी भूमिका विक्रेत्या शशिकला गुरव यांनी मांडली.

लोकशाही जिवंत आहे की नाही, असंख्य तरुणांचा राजकीय नेत्यांना सवाल –

मी आतपर्यंत दोन वेळेस मतदान केले आहे.पण सध्याची राजकीय घडामोडी लक्षात घेता. या पुढील काळात होणार्‍या निवडणुकीत मतदान करायचे की नाही. तसेच लोकशाही जिवंत आहे की नाही.हा देखील प्रश्न निर्माण झाला.

त्याच बरोबर सध्यस्थितीला कार्यकर्त्यांना तुम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहात, विचारल्यावर ते देखील सांगू शकत नाही. असा सवाल देखील अनेक तरुणांनी यावेळी उपस्थित केला.

Talegaon Dabhade : इंद्रायणीच्या ‘सचिन’ने सार्थ केला ‘विश्वास’!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.