Pimpri Chinchwad : गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यासाठी एकवटले हिंदू

एमपीसी न्यूज : सकल हिंदू समाज समन्वय (Pimpri Chinchwad) समिती पिंपरी चिंचवडच्या वतीने चिंचवड येथील महावीर चौकातून विराट हिंदू जन गर्जना मोर्च्याला सुरुवात झाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात मोर्च्याचा समारोप करण्यात आला.

गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात पिंपरी चिंचवड शहरातील अनेकविध संघटनांसह सकल हिंदू समाज सहभागी झाल्या आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा मोर्चा मुंबई – पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडने पायी जात असल्याने हायवेच्या सर्व्हिस रोड वरून वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे.

समारोप सभेत स्वरूपा भोईने म्हंटले, कि “धर्मांतरण हे कुणाला फूस लावून, कुणाला बळजबरीने केले जाते. जर 10 वर्षात हिंदूंची संख्या पाच टक्क्यांनी घटत आहे, त्याचे कारण त्यांचे पहिल्यापासून धोरण आहे, कि हिंदू बटा तो देश घटा. त्याचे बीजवंती उदाहरण काश्मीर फाईल्स आहे. हे संघटन आपल्याला टाळायचे आहे. आपण जशी सती जायची परंपरा मोडीत काढली. बालविवाह परंपराची मुळे काढली. तर आम्हाला सरकारला आवाहन करायचे आहे, की धर्मांतरण मोडीत काढा, गोहत्या मोडीत काढा, लव्ह जिहाद मोडीत काढा. सगळ्या मुलींना आवाहन आहे, कि प्रेम करा पण डोळसपणे करा. डोळे उघडे ठेवून करा. त्यामुळे जे आपल्यावर धर्मांतरणाचे संकट आले आहे ते आपण टाळू शकू.”

Chinchwad News : चिंचवड येथून विराट हिंदू जन गर्जना मोर्चाला सुरुवात

व्याख्याते सौरभ कर्डे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळजवळ (Pimpri Chinchwad) वर्षभर गोतस्करी चालू आहे. भुलीचे इंजेक्शन देऊन गाईंना पकडून नेण्यात येते. आपले बरेच गोरक्षक त्याविषयी पालिकेत जाऊन निषेध करतात. ख्रिश्चन मिशनऱ्यांपासून सावध रहा. प्रत्येक नागरिकाची, तरुणाची, स्त्रीची जबाबदारी आहे, की आपल्या शेजारच्या पाच घरावर लक्ष ठेवावे. त्या घरांमध्ये काय चालू आहे. कोणाची नजर त्या घरांवर आहे. कोणत्या घरात येतं, जातं त्यावर लक्ष ठेवा. ख्रिश्चन मिशनरी ये-जा करत आहेत का? ते पहा. गोड गोड बोलून पेशांची औषधाची मदत करून त्यांना देव घराबाहेर काढायला सांगताहेत का? जो आमच्या घरातून आमचा देव बाहेर काढायला लावतो त्याला देशाच्या बाहेर काढल्याशिवाय शांत बसायचे नाही.

ते पुढे म्हणाले, की कुठलाही मिशनरी गोड गोड बोलून धर्मांतर करायला आले. जोपर्यंत तुम्ही आम्ही आहोत आणि महाराष्ट्रात प्रत्येक मंदिरात टाळ वाजतोय तोपर्यंत हिंदू धर्म कधीही संपू शकत नाही. एवढी हिंदू धर्माची ताकत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.