Pune : भरधाव कारने पाच शेतमजुरांना चिरडले,तिघांचा मृत्यू
एमपीसी न्यूज – कल्याण – अहमदनगर ( Pune ) मार्गावर एका भरधाव कारने पाच शेत मजूरांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
Chinchwad : घंटागाडी कर्मचाऱ्याने गाडीभर निर्माल्यातून शोधले मंगळसूत्र
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेतातील कामे उरकून पायी घरी जात असताना या पाच मजूरांना महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी (एम एच 12 व्ही क्यू 8909) या गाडीने उडवले.
कल्याण-अहमदनगर महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे हद्दीत झालेल्या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला ( Pune ) आहे.