Pune News : ‘सामना’च्या संपादिका रश्मी ठाकरे यांना चंद्रकांत पाटील यांचे पत्र

एमपीसी न्यूज : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून भाजपच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दात टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. ‘सामना’तील भाषा भाजपच्या जिव्हारी लागली असून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी व ‘सामना’च्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्याकडे या आक्षेपार्ह भाषेसंदर्भात लेखी तक्रार केली आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांना रीतसर पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘सामाना’वर टीका केली आहे.

पाटील म्हणाले, माझे पत्र रश्मीवहिनींना पाठवलं आहे. सामना अग्रलेखातून ज्या प्रकारे भाषा वापरली जाते. त्यात मी म्हटलं आहे, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही सुसंकृत आहात. त्यामुळे तुम्हाला ही भाषा आवडत नसेल. पण ती भाषा तुम्हाला आवडत असेल तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा.

सामनात जे जे लिहिलं जात त्याला तुम्ही सहमत आहात असं होतं. सहमत असाल तर माझी काही हरकत नाही, असंही पत्रात म्हटलं आहे. संजय राऊत यांनी या पत्राला कंम्प्लेट नावाचे रूप दिले.

आम्ही सामना नेहमीच वाचतो, आमच्यावर काय टीका झाली ते बघायला. मात्र, त्यात टीकेव्यतिरीक्त काहीच नसतं. तर, संजय राऊत घाबरत नाही असं म्हणाले. पण ते रश्मी वहिनींना घाबरत नाहीत, असे म्हणत असावेत, असा टोलाही देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.