Talegaon : वर्षाखेरीस पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
एमपीसी न्यूज – वर्षाखेरीस मित्रासोबत पोहायला (Talegaon)गेलेल्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 31) दुपारी वराळे गावाजवळ घडली.
मयूर भाटी (वय 30, रा. शिक्षक सोसायटी, वराळे, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Maharashtra Chief Secretary : डॉ. नितीन करीर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
पोलीस निरीक्षक संजय तुंगार यांनी दिलेल्या (Talegaon)माहितीनुसार, मयूर हा रविवारी त्याच्या मित्रासोबत इंद्रायणी नदीत पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी मयूरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. वर्षाच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.