Pimpri: पाणी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार – संतोष लोंढे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहारातील पाणीप्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष लोंढे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी लोंढे यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड झाली.  राष्ट्रवादीने माघार घेतल्याने लोंढे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लोंढे म्हणाले, शहराचा विकासाचा आलेख वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पाणी, आरोग्य, वैद्यकीय सुविधांना प्राधान्य देणार आहे. मेट्रोचे काम वेळेत पुर्ण होण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे.

भाजपने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्थायी समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे मी आभार मानतो. ऋण व्यक्त करतो, असेही लोंढे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.