Alandi News : पिकात जनावरे सोडल्याचा जाब विचारला म्हणून शेतकऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज कांद्याच्या पिकामध्ये जनावरे चरण्यास का सोडली म्हणून विचारपूस केली म्हणून भावकीतल्याच चार जणांनी शेतऱ्याला बेदम मारहाण केली आहे. (Alandi News) हा प्रकार सोमवारी (दि.2) दुपारी  खेड जवळील सोळू गावात झाला.

याप्रकरणी मेघनाथ तुकाराम गोडसे (वय 29 रा.सोळू) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नवनाथ कोंडिबा गोडसे, अजय नवनाथ गोडसे, सुदाम कोंडिबा गोडसे, अनिकेत सुदाम गोडसे (सर्व रा. सोळू) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pimple Gurav News : पिंपळे गुरव येथील प्रसिद्ध कवी ,लेखक निशिकांत गुमास्ते यांचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेतात कांदा व उसाचे पिक आहे. त्या कांद्याच्या पिकात नवनाथ याने त्याची जनावरे चरण्यास सोडली. याचाच जाब फिर्यादी यांनी विचारला असता आरोपीने शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली, तसेच इतर आरोपींना बोलावून फिर्यादीला हाताने, लाकडी बांबूने व दगडाने मारहाण करत जखमी केले. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात चौघां विरोधात गुन्ह दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.