Mumbai : शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपालांचा नकार – आदित्य ठाकरे
एमपीसी न्यूज – शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेची इच्छा व्यक्त केली. मात्र, सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी दोन दिवसांची मुदत वाढ त्यांनी राज्यपालांकडे मागितली. मात्र, राज्यपालांनी ही वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेना व महाआघाडीचे सरकार सत्ता स्थापन होणार अशा जोरदार चर्चा असताना काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र वेळेत न पाठविले नाही. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हे दिसत आहे. काँग्रेसमुळे शिवसेनेची मोठी अडचण झाली आहे.