Alandi : ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी आळंदीकरांनी पुढाकार घ्यावा – कैलास केंद्रे

एमपीसी न्यूज : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत (Alandi) असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक/स्वातंत्र्य संग्रमात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. यासाठी केंद्र शासनामार्फत गेले वर्षभर ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी हर घर तिरंगाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचानाप्रमाणे आळंदी नगरपरिषदेकडूनही ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षीसर्व आळंदीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवायचा आहे.

Alandi : आळंदीकरांची चिंता मिटली; डोळे लागण रुग्णसंख्येत घट

गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रत्येकाने आपल्या घरावर 13 ऑगस्ट रोजी सकाळी झेंडा फडकवायचा आहे. तर, तो झेंडा 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता खाली उतरवून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.