Bjp : सत्तेसाठी तडजोडी करणे ही भाजपची अपरिहार्यता – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – हिंदुत्व देशात रुजविण्यासाठी (Bjp) भाजप सत्तेवर येणे आवश्यक आहे आणि सत्तेवर येण्यासाठी काही तडजोडी करणे ही भाजपची अपरिहार्यता आहे. देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी महत्वाचा आहे. तत्व आणि लोक काय म्हणतील हा आदर्शवादी विचार करत राहिल्यामुळेच भाजप 60 वर्षे सत्तेपासून दूर राहिला. त्यामुळे राजकारणाची काडीमात्र जाण नसलेल्या सोशल मीडियावरील नवशिक्या लोकांनी व्यवहारिक राजकीय पक्ष बनलेल्या भाजपला उपदेश देऊ नये, असे प्रत्युत्तर भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी टीकाकारांना दिले आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेण्यावरुन सोशल मीडियावर भाजपविरोधात टीकास्त्र सोडले जात आहे. त्याला गोरखे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार लोकसभेत 1 मताने कोसळले होते. लोकसभेचा प्रत्येक मतदारसंघ भाजपसाठी महत्वाचा आहे. अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रभाव 3 लोकसभा मतदारसंघात आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान करणा-या सुष्मा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून उबाठा गटात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना नेता बनवले. तेव्हा उबाठा गटातील जुन्या नेत्यांची काळजी कोणाला वाटली नाही. आज सुष्मा अंधारे या नेता बनून महाराष्ट्रात फिरतात आणि उबाठा गटाचे जुने नेते त्यांच्यामागे चालतात.

Chikhali : बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

इतर राजकीय पक्षांचे थातुरमातुर नेते उबाठा गटात आले की ते शिवबंधन, पण भाजपमध्ये इतर राजकीय पक्षांचे मातब्बर नेते आले की ते अनैतिक राजकारण हे कसे चालेल. महाआघाडीत इतर पक्षांचे नेते आले की ते शरद (Bjp) पवार यांचे बेरजेचे राजकारण,पण भाजपमध्ये नेते आले की ते पक्षांची फोडाफोडी. सत्तेशिवाय विचारधारेचे तुणतुणे वाजवणे व्यर्थ असते. भाजप सत्तेवर होता म्हणूनच राममंदिर निर्माण झाले. कलम 370 हटविले, बॉम्बस्फोट थांबले,सर्जिकल स्ट्राईक झाली, असेही गोरखे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.