Pimpri : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठींबा
नवी दिल्लीत यापूर्वी एक वर्षापेक्षा अधिक काळ हे आंदोलन झाले,त्यादरम्यान केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्याला चिरडून मारले होते. दिल्ली येथे ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांपुढे अखेर सरकार झुकले आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या व कायदा मागे घेत असल्याचे खुद्द पंतप्रधान यांनी जाहीर केले.
देशातील शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन पुकारले होते, आता पुन्हा एकदा 6 महिन्याचे खाद्य साहित्य सोबत घेऊन शेतकरी पुन्हा दिल्लीकडे कूच केली आहे. या आंदोलनादरम्यान शुभकिरण सिंग व दर्शन सिंग या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
यावेळी प्रदेश सचिव तुषार घाटोळे, निमंत्रक नाना कसबे, सलीम डांगे, अरुण जाधव, राजेश माने, विकास माने, सुधीर कांबळे, मनोज यादव, तुषार मोरे ,अर्चना कांबळे, सविता जाधव ,वनीता कदम आदी उपस्थित होते.