Pune : आधुनिक भारतात लोकशाही धोक्यात आहे – शशी थरूर यांचे विधान
‘ निरोगी, आनंदी, सुरक्षित पुण्यासाठी – माझा शब्द.’ असे जाहीरनाम्याचे वैशिष्ट्यपूर्ण नाव ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी धंगेकर यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, प्रचार प्रमुख मोहन जोशी, अ. भा. काँग्रेस कमिटीचे प्रभारी आशिष दुआ, अभय छाजेड, अंकुश काकडे, गजानन थरकुडे, गोपाळ तिवारी, राज अंबिके आदींसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहीद हेमंत करकरेंच्या मुत्यूची चौकशी झाली पाहिजे
शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झालेला नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर थरूर म्हणाले, यामध्ये नेमके तथ्य काय आहे, हे मला माहीत नाही. माजी पोलिस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकात तसा उल्लेख आला आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे. करकरे आणि माझे चांगले संबंध होते. त्यामुळे या प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी झाली पाहिजे. जे काय खरे आहे ते जनतेच्या समोर आले पाहिजे, असेही डॉ. थरूर म्हणाले.
Pune: राहुल गांधी यांच्या सभेने पुण्याचा माहोल काँग्रेसमय – रवींद्र धंगेकर