Pune : धायरीत जमिनीच्या वादातून नातेवाईकांकडून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – जमिनीच्या वादातून नातेवाईक तरुणावर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने ( Pune ) वार करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरूद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, खून झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात आंदोलन केले. नातेवाईकांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.

आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे (वय 19 , रा. खंडोबाचा मळा, रायकर मळा, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संपत तानाजी काळोखे, सागर पोपट रायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी काळोखे, रायकर पसार झाले असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.

Alandi : आळंदीमध्ये राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय 58 वे वार्षिक अधिवेशन संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि आरोपी नातेवाईक आहेत. त्यांच्यात जमिनीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता सुमारास आदित्य कामगारांसह जागेवर पत्र्याच्या शेडचे काम करत होता. त्यावेळी काळोखे आणि रायकर तेथे आले. आदित्य आणि आरोपींमध्ये वाद झाला.
त्यानंतर आरोपींनी आदित्यवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू ( Pune ) झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.