Pune News : कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा निषेर्धाथ पुणे शहर महिला काँग्रेस पार्टीचे आंदोलन

एमपीसी न्यूज : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने एका मुलाखती दरम्यान थेट भारत देशाच्या स्वातंत्र्यावर वक्तव्य केले आहे. कंगना रनौत म्हणाली की, ‘रक्त वाहणारचं होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. 1947 मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं आहे. असे कंगना राणावत हिने वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात आला.

त्यानंतर पुणे शहर महिला काँग्रेस पार्टी तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. या वक्तव्याचा निषेध पुणे शहर महिला काँग्रेस पार्टी तर्फे पुण्यात बालगंधर्व चौक येथे करण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी केले. या निषेध आंदोलनला पुणे शहर महिला काँग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभय घाजेड, शर्वरी गोतारने, कांचन बालनायक, राजश्री अडसूळ, शारदा विर, रजिया बल्लारी, छायाताई जाधव, मिराताई शिंदे, ललिता जगताप, नंदा डावरे, पौर्णिमा भगत, अर्चना जाधव, ताई कसबे,गीता तारु, व काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोहन जोशी म्हणाले, ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने वेताळ वक्तव्य केले. केलेले वक्तव्य एकदम चुकीचे आहे. कंगना राणावत हिने माफी मागावी अशी आमची मागणी आहे. असे मोहन जोशी म्हणाले.

सोनाली मारणे म्हणाल्या, कंगना राणावत ही जरी मोठी अभिनेत्री असली तरी तिला भारताच्या स्वातंत्र्य बद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही. पुणे शहर महिला काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो. जर कंगना राणावत यांनी माफी मागितली नाही तर आम्ही येथील पुढील काळात कंगना राणावत विरुद्ध अजून आंदोलन तीव्र करणार. असे सोनाली मारणे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.