Akurdi News : वीजवितरण मंडळाच्या गलथान कारभारामुळे तरुणाचा मृत्यू; 50 लाखांची मदत द्या; भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांची मागणी

एमपीसी न्यूज – वीजवितरण मंडळाच्या गलथान कारभारामुळे कळभोरनगरमधील तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा आरोप करत वीजवितरण मंडळाने तरुणाच्या कुटुंबाला 50 लाख रुपयाची भरपाई द्यावी. कुटुंबातील एकाला वीजवितरण कंपनीमध्ये त्वरित नोकरी द्यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.काळभोरनगरमधील तरुण कार्यकर्ते नितीन काशिनाथ मेलाळे (वय 34) यांचे शुक्रवारी सकाळी 7 वाजता विजेच्या खांबाला हात लागल्यामुळे शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे वीजवितरण कंपनीच्या गलथान काभारामुळे घडले आहे. युवा तरुणाला जीवाला मुकावे लागले आहे. त्यामुळे वीजवितरण कंपनीने या कुटुंबाला त्वरित 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. त्या कुटुंबातील एकाला वीजवितरण कंपनीमध्ये कायमस्वरुपाची नोकरी द्यावी.

 

नितीन यांच्या मागे त्यांची दोन लहान मुले, पत्नी, आई, वडील व एक लहान भाऊ असे कुटुंब आहे. नितीन हे एका खासगी कंपनीमध्ये काम करत होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील हा एक उमदा तरुण होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.