Manobodh by Priya Shende Part 31: महासंकटी सोडिले देव जेणे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 31 – (Manobodh by Priya Shende Part 31)

महासंकटी सोडिले देव जेणे

प्रतापे बळे आगळा सर्व गुणे

जया ते स्मरे शैलजा शूलपाणी

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

ह्या श्लोकांत समर्थांनी पुन्हा एकदा रामचंद्र कसे आहेत याचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात की, “महासंकटी सोडिले देव जेणे”. म्हणजे रामायण काळामध्ये रावणाने पराक्रम करून देवांनाच बंदीवासात ठेवून त्यांना तो त्रास देत होता. तेव्हा भगवंतानेच प्रभुरामचंद्रांचा अवतार धारण करून रावणाचा निःपात करून सर्व बंदी असलेल्या देवांना बंदिवासातून मुक्त केले. आणि ते राज्य बिभीषणाचा ताब्यात दिले. जेव्हा जेव्हा देवांवर संकट आलं तेव्हा तेव्हा विष्णूने अवतार धारण करून देवांना संरक्षण दिले आहे.

म्हणूनच भगवंताची थोरवी सांगताना ते ह्या श्लोकात म्हणताहेत की, “प्रतापे बळे आगळा सर्व गुणे”.

Brig. Hemant Mahajan : चुकवू नका… सशस्त्र सेना दलातील करियरच्या संधी!

प्रताप प्रेम म्हणजे महाप्रतापी, पराक्रमी. बळी म्हणजे बलशाली सामर्थ्यवान. अरे आगळा म्हणजेच आगळावेगळा सर्वांपेक्षा भिन्न. सर्व गुणे म्हणजे सद्गुणांनी, सर्व गुणांनी संपन्न असा हा भगवंत आहे. ज्या भगवंताचे पराक्रमी, बलशाली, सद्गुणांनी भरलेला असं वर्णन केलंय तो भगवंत अत्यंत प्रेमळही आहे. त्याचा उदो उदो (Manobodh by Priya Shende Part 31) त्रेेलोक्यातून होतो.

देवादिक त्याला वंदन करतात. त्याला साक्षात भगवान शंकर महादेव आणि पार्वती सुद्धा स्मरतात असं समर्थ तिसऱ्या चरणात सांगत आहेत की, “जया ते स्मरे शैलजा शूलपाणी. आणि पुढे तो शेवटच्या चरणात म्हणतात की,” नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”

असा परमेश्वर आपल्या भक्तांना उपेक्षित ठेवत नाही. तो कसा आगळा वेगळा आहे, भक्तांची कशाप्रकारे मदत करतो, हे सांगताना कित्येक उदाहरणं आपण बघू शकतो. कबीरा साठी तो शेले विणतो. जनाबाईंकडे घरी दळण कांडण करतो. अर्जुनाला लढाईला प्रवृत्त करतो. पुंडलिकाच्या भेटीसाठी अठ्ठावीस युगे एका छोट्या विटेवर उभा राहतो. कोणाकडे पाणी भरतो तर, कोणाला मडकी बनवायला मदत करतो. अगदी हल्ली चे उदाहरण घ्यायचं झालं तर परिक्रमेत मार्ग दाखवतो. शंकांची प्रश्नांची उत्तरं कोणत्या ना कोणत्या (Manobodh by Priya Shende Part 31) स्वरूपात येऊन देतो. अशी कित्येक अचंबित करणाऱ्या गोष्टी तो आपल्या भक्तांसाठी करत असतो. भक्ताने फक्त आपलं सत्कर्म करत सतत भक्तीत रममाण व्हावं म्हणजे भगवंत कधी भक्ताला अंतर देणार नाही.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.