Mumbai: संविधान बदलण्यासाठी, देशाचं नाव बदलण्यासाठी यांना 400 पार हवंय-उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज -आज मुंबई मधील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीची(Mumbai ) सभा झाली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले,संविधान बदलण्यासाठी, देशाचं नाव बदलण्यासाठी यांना 400 पार हवंय. ‘अबकी बार 400 पार’ चा भाजपचा नारा आहे, पण यांना 400 पार का हवंय? संविधान बदलण्यासाठी, देशाचं नाव बदलण्यासाठी यांना ‘400 पार’ हवंय.

भाजप एक फुगा आहे. मला वाईट याचं वाटतं की, या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात भाजपचे दोन खासदार होते. त्या फुग्यात आम्ही हवा भरली, त्यांच्या डोक्यात आता हवा गेली. काय त्यांची स्वप्न. 400 पार जागा म्हणजे काय फर्निचरचं दुकान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Mumbai : आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ-शरद पवार

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले  की, ‘कोणीही राज्यकर्ता अमर पट्टा घेऊन येत नाही. या देशाच्या जनतेसमोर हुकूमशहा कितीही मोठी असला तरी , ज्यावेळेस सर्व लोक एकवटात त्यावेळी हुकूमशहाचा अंत होतो. आज ती वेळ आलेली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.

‘तेजस्वी यादव यांनी जसा नारा दिला तसा मी देखील एक नारा या सभेत देतो.  मी म्हणतो आपकी बार भाजपा पार आणि याची सुरवात आजपासून झालेली आहे. मशाल हातात घेऊन आपल्याला रणशिंग महाराष्ट्रभर फुंकायचे आहे. मुंबईतून जेव्हा एखादी गोष्ट बोलली जाते तेव्हा संपूर्ण देश त्या वाटेवरून चालतो’.

ठाकरे म्हणाले की, आजपासून लोकशाही रक्षणाची सुरुवात होत आहे. मी त्या हुकूमशहांना सांगतोय, देशाची जनता माझ्यासमोर बसली आहे. जनता आमच्या सोबत आहे. तुम्ही कितीही अत्याचार करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. आपकी बार भाजपा तडीपार हा नारा घेऊन गावागावात जा आणि या हुकूमशाही राजवटीचा अंत करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.